भारतरत्न पुरस्कार
भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रतिवर्षी साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक व सार्वजनिक सेवा आदी क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
**पुरस्काराचे स्वरूप:
सुरुवातीला एका सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध सूर्य प्रतिमा व तिच्याखाली देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले शब्द असे पदकाचे स्वरूप होते. नंतर या पदकाचे डिझाईन बदलवून तांब्याने बनवलेल्या पिंपळाच्या पानावर प्लॅटिनियम चा सूर्य बनवला आहे व त्यावर चांदीने ' भारतरत्न ' असे शब्द लिहिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह 'चौमुखी सिंहाची प्रतिमा' अशा प्रकारचे हे पदक आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कुठली ही रोख रक्कम किंवा मानधन मिळत नाही.
**पुरस्काराविषयी काही ठळक बाबी:
* हा सन्मान देण्यास देशात 1954 पासून सुरुवात झाली.
* 1955 पासून पुरस्काराच्या कायद्यात बदल करून मरणोपरांत पुरस्कार देण्यास सुरुवात झाली
*पदक कोलकत्ता येथील टाकसाळीत तयार केले जाते.
* एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. याला अपवाद 1999 आहे. 1999 मध्ये चार व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला.
* 1977 मध्ये जनता दलाने या पुरस्कारावर बंदी घातली होती, परंतु 1980 मधील इंदिरा गांधी सरकारने पुन्हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
* 2011 पासून नियमात बदल करून सर्व क्षेत्रांसाठी भारतरत्न पुरस्कार दिला जातो.
* आतापर्यंत 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
* आतापर्यंत एकूण 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
* भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.
1. इंदिरा गांधी - 1971
2. मदर टेरेसा - 1980
3. अरुणा असफ अली - 1997
4. एम एस सुब्बुलक्ष्मी - 1998
5. लता मंगेशकर - 2001
*भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये सहा राष्ट्रपती आहे.
1. डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण 1954
2. डॉ राजेंद्र प्रसाद 1962
3. झाकीर हुसेन 1963
4. वराहगिरी वेंकट गिरी 1975
5. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 1997
6. प्रणव मुखर्जी 2019
*भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती मध्ये सात पंतप्रधानांचा समावेश आहे.
1. पंडित जवाहरलाल नेहरू 1955
2. लालबहादूर शास्त्री 1966
3. इंदिरा गांधी 1971
4. मोरारजी देसाई 1991
5. रजिव गांधी 1991
6. गुलझारीलाल नंदा 1997
7. अटल बिहारी वाजपेयी 2015
*आतापर्यंत दोन विदेशी सन्माननीय नागरिकांना देखील भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
1. खान अब्दुल गफार खान 1987
2. नेल्सन मंडेला 1990
**पुरस्कार प्राप्त व्यक्तींसाठी विशेष बाबी:
• भारतात मोफत फर्स्टक्लास विमान व रेल्वे प्रवास.
• राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास हजर राहू शकतात.
• गणतंत्र प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख अतिथी.
• झेड प्रकारची सेक्युरिटी.
• टॅक्समधून सुट, पेन्शन 50% .
• इंडियन ऑर्डर ऑफ प्रिसेडन्स मध्ये सातवे स्थान.
• त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी
••भारतरत्न सन्मानाचे मानकरी••
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1954
2. सी. राजगोपालचारी 1954
3. डॉ. सी. व्ही. रमण 1954
4. डॉ. भगवान दास 1955
5. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 1955
6. पं. जवाहरलाल नेहरू 1955
7. गोविंद वल्लभ पंत 1957
8. डॉ. धोंडो केशव कर्वे 1958
9. डॉ. बिधनचंद्र रॉय 1961
10. पुरुषोत्तम दास टंडन 1961
11. डॉ. राजेंद्र प्रसाद 1962
12. डॉ. झाकिर हुसैन 1963
13. डॉ. पांडुरंग वामन काणे 1963
14. लालबहादूर शास्त्री (मरणोत्तर) 1966
15. इंदिरा गांधी 1971
16. वराहगिरी वेंकटगिरी 1975
17. कुमारस्वामी कामराज (मरणोत्तर) 1976
18. मदर टेरेसा 1980
19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) 1983
20. खान अब्दुल गफारखान 1987
21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) 1988
22 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) 1990
23.डॉ. नेल्सन मंडेला 1990
24. वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) 1991
25. राजीव गांधी (मरणोत्तर) 1991
26. मोरारजी देसाई 1991
27. मौलाना अबुल कलाम आझाद
(मरणोत्तर) 1992
28. जे. आर. डी. टाटा 1992
29. सत्यजित रे 1992
30. अरुणा असफअली (मरणोत्तर) 1997
31. गुलझारीलाल नंदा 1997
32. सी. सुब्रमण्यम 1998
33. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम 1998
34. एम. एस. सुब्बलक्ष्मी 1998
35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) 1999
36.डॉ. अमर्त्य सेन 1999
37. पंडित रविशंकर 1999
38. गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) 1999
39. उस्ताद बिस्मिल्ला खाँ 2001
40. लता मंगेशकर 2001
41. पंडित भीमसेन जोशी 2008
42. सी. एन.राव 2014
43. सचिन तेंडुलकर 2014
44. पंडित मदन मोहन मालवीय 2015
45. अटल बिहारी वाजपेयी 2015
46. प्रणव मुखर्जी 2019
47. नानाजी देशमुख 2019
48. भूपेन हजारिका 2019
Thank you helpful info to update my knowledge
ReplyDelete