१०. शर्थीने खिंड लढवली
स्वाध्याय
१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
अ) सिद्दी जौहरने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला.
आ) बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले.
इ) घोडखिंड पावनखिंड नावानेच इतिहासात अमर झाली.
----------------------------------------------------
२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला?
उत्तर - शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी 'लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप' सिद्दीला पाठवला.
----------------------------------------------------
आ) सिद्दी जौहर का चवताळला ?
उत्तर - शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येतात सिद्दी जौहर चवताळला.
-----------------------------------------------------
इ) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले?
उत्तर - विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले, "आम्ही गडावर जातो तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या."
-----------------------------------------------------
३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती केली ?
उत्तर - शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती शिवा काशीद राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी युक्ती होती.
------------------------------------------------------
आ)बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली ?
उत्तर - बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीचत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांची दगडगोटे जमा केले आणि त्या आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली अशा प्रकारे बाजीप्रभूंनी शत्रूला खिंडीत रोख.
------------------------------------------------------
४.कारणे लिहा.
अ) आदिलशाहा भयंकर चिडला.
कारण - अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. म्हणून आदिलशाहा भयंकर चिडला.
----------------------------------------------------
आ) शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला.
कारण - शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटण्याची योग्य योजना आखली. त्यानुसार शिवरायांचे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पकडली गेली व तेथे जल्लोष सुरू झाला. थोड्याच वेळात शिवाजीचे सोनग उघडकिस आले व सिद्दिने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवाजीने केलेल्या आत्मबलिदानामुळे तो अमर झाला.
-----------------------------------------------------
आ) पावनखिंड इतिहासात अमर झाली.
कारण - स्वामिभक्त बाजीप्रभूंनी घोडखिंडीत सिद्दी जौहरच्या सैन्याला थोपवून धरले. हे करताना बाजीप्रभूंना अनेक जखमा झाल्या, पण ते मागे हटले नाही. शिवराय विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफांचा आवाज ऐकून नंतर त्यांनी प्राण सोडले. घोडखिंड स्वामिभक्ताच्या रक्ताने पावन झाली, म्हणून पावनखिंड इतिहासात अमर झाली.
------------------------------------------------------
५.कोण ते लिहा.
अ) शूर पण क्रूर होता - सिद्दी जौहर
आ) घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे - बाजीप्रभू
इ) वेढ्यातून निसटून जाणारे - शिवराय
------------------------------------------------------
No comments:
Post a Comment