DAILY EDUCATION

Monday, February 12, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

 


८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

स्वाध्याय

१.चुकीची जोडी ओळखा

अ) फलटण - निंबाळकर

आ) जावळी - मोरे

इ) सुपे - जाधव

*चुकीची जोडी : सुपे - जाधव

-------------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) जावळीच्या मोर्‍यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?

उत्तर - जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने '' हा किताब दिला होता.

----------------------------------------------------

आ) जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?

उत्तर -  जावळीच्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले, म्हणून जावळीचा विजय फार महत्वाचा होता.

---------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) जावळीच्या मोर्‍यांच्या वाटेला कोणी का जात नसे?

 उत्तर - जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत असत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे.

---------------------------------------------------

 आ) शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले?

 उत्तर - शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र धाडले,' तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.' या पत्राचे उत्तर मोऱ्यांनी उद्धटपणे लिहिले. म्हणून शिवरायांनी या पत्राचे उत्तर अशाप्रकारे दिले, जावळी खाली करून, राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन, हुजुराची चाकरी करणे. इतकीयावर बंडखोरी केलिया मारले जाल.'

--------------------------------------------------


No comments:

Post a Comment