६. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा
स्वाध्याय
१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:
अ) पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते.
आ) मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती.
इ)शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.
----------------------------------------------------
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा:
अ) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?
उत्तर- "हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया."असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.
----------------------------------------------------
आ )जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला?
उत्तर - आपण मनी धरले ते बालराजे पूर्ण करणार, असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.
-------------------------------------------------
इ )शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडान् खडा माहिती मिळवली?
उत्तर - शिवरायांनी पुण्याभोवतीच्या चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडान् खडा माहिती मिळवली.
-------------------------------------------------
ई )शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले?
उत्तर - वतनाचा विलक्षण लोभ असणारे देशमुख आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे, हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे शिवरायांनी ठरवले.
-----------------------------------------------------
३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शिवरायांचे ध्येय कोणते होते?
उत्तर - सुलतानशाहीच्या वतनदारीवरच अवलंबून न राहता आपले 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करायचे. परक्यांची गुलामगिरी करायची नाही, मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे हे शिवरायांचे ध्येय होते.
----------------------------------------------------
आ)शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला?
उत्तर - शिवराय स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला.
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment