DAILY EDUCATION

Sunday, February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ३. संतांची कामगिरी

 


३. संतांची कामगिरी

*स्वाध्याय

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

 अ) संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.


 आ ) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.


इ )संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.


ई )समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.

---------------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?

 उत्तर - श्रीचक्रधर स्वामींना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.

------------------------------------------------

आ) संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला ?

उत्तर - संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला.

-----------------------------------------------

इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? 

उत्तर - प्राणीमात्रांवर दया करा असा संत एकनाथांनी लोकांना उपदेश केला.

----------------------------------------------

ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? 

उत्तर - 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे,' हा समर्थ रामदासांनी संदेश दिला.

------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले?

 उत्तर - संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही; सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून ते आत दुःख करत बसले.

-------------------------------------------------

आ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?

उत्तर - 'जे का रंजले गांजले|त्यांसी म्हणे जो आपुले 

          तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा |'

 असा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.

-------------------------------------------------

No comments:

Post a Comment