३. संतांची कामगिरी
*स्वाध्याय
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.
आ ) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.
इ )संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.
ई )समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.
---------------------------------------------------
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?
उत्तर - श्रीचक्रधर स्वामींना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.
------------------------------------------------
आ) संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला ?
उत्तर - संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला.
-----------------------------------------------
इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला?
उत्तर - प्राणीमात्रांवर दया करा असा संत एकनाथांनी लोकांना उपदेश केला.
----------------------------------------------
ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?
उत्तर - 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे,' हा समर्थ रामदासांनी संदेश दिला.
------------------------------------------------
३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले?
उत्तर - संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही; सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून ते आत दुःख करत बसले.
-------------------------------------------------
आ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?
उत्तर - 'जे का रंजले गांजले|त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा |'
असा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment