१५.एक अपूर्व सोहळा
स्वाध्याय
१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली.
( सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची )
---------------------------
आ) शिवरायांचा राज्याभिषेक सन १६७४ मध्ये झाला.
( १६७४,१६७५,१६४७ )
-----------------------------------------------------
२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते ?
उत्तर - सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते.
------------------------------------------------------
आ) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला?
उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून ' राज्याभिषेक ' हा शक सुरू केला.
--------------------------------------------------
३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले?
उत्तर - मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी व सर्व धर्मांना सारखे वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा निर्माण झाला होता, हे जगाला कळायला हवे तसेच स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.
--------------------------------------------------
आ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड का केली?
उत्तर - रायगड हा किल्ला मजबूत होता. जिंकायला अवघड होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते व शत्रूवर नजर ठेवायला सोईचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली.
----------------------------------------------------
इ) मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले ?
उत्तर - शिवरायांवर सात नद्यांच्या पाण्याचा जलाभिषेक झाल्यावर ते उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले, त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न साकार झाले होते. म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
--------------------------------------------------------
No comments:
Post a Comment