१४. गड आला पण सिंह गेला
स्वाध्याय
१.अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा.
अ) तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता.
१) महाड ⚪ २) चिपळूण ⚪
३) उमरठे 🔴 ४) रत्नागिरी ⚪
---------------------
आ) जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता.
१) पुरंदर ⚪ २) कोंढाणा 🔴
३) रायगड ⚪ ४) प्रतापगड ⚪
-------------------------
इ) तानाजीच्या भावाचे नाव हे होते.
१) रायबा ⚪ २) सूर्याजी 🔴
३) मुरारबाजी ⚪ ४) फिरंगोजी ⚪
-----------------------------------------------
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता?
उत्तर - कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.
-----------------------------------------------
आ) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?
उत्तर - "कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे." असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या.
---------------------------------------------------
इ) आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले?
उत्तर - आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले.
-----------------------------------------------
३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा
अ) शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले ?
उत्तर - शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले, शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत."
-------------------------------------------------
आ)सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?
उत्तर - सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला, "अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागुबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रू वर तुटून पडा."
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment