१२. पुरंदरचा वेढा व तह
स्वाध्याय
१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ) त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत.
( पुणे, सुरत, दिल्ली )
----------------------
आ)पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता
( बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी )
-----------------------------------------
२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?
उत्तर - औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.
-----------------------------------------
आ) दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?
उत्तर - शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.
-----------------------------------------
इ) मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?
उत्तर - शक्ति चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी ठरवले.
-----------------------------------------
ई) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूख देण्याचे कबूल केले?
उत्तर - पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होनाचा मुलूख देण्याचे कबूल केले.
----------------------------------------
३.दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्यास काय म्हणाला?
उत्तर - खान मुरारबाजीला म्हणाला," मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील जहागीर देतील, बक्षीस देतील."
-----------------------------------------
आ) मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले ?
उत्तर - "अरे आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला?" असे मुरारबाजीने दिलेरखानास उत्तर दिले.
----------------------------------------
४.कोण ते लिहा
अ) औरंगजेब
आ) पुरंदर
इ) मुरारबाजी
ई) जयसिंग
उ) दिलेरखान
-----------------------------------------------------
No comments:
Post a Comment