DAILY EDUCATION

Tuesday, February 13, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १३.बादशहाच्या हातावर तुरी दिल्या



१३.बादशहाच्या हातावर तुरी दिल्या 

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता.

( पन्नासावा, चाळीसावा, साठावा )

              ------------------------------

आ) आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.

( झाशीत, मथुरेत, ग्वालियर )

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?

उत्तर - आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला.

---------------------------------------------------

 आ) आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले?

उत्तर - आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले. 

--------------------------------------------------

इ)आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?

उत्तर - आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटले पाठवण्यास सुरुवात केली. 

--------------------------------------------------

३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले?

उत्तर - शिवराय महाराष्ट्राचे राजे होते व त्यांचा मान पहिल्या रंगीत राहण्याचा होता. परंतु बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे करून त्यांचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्यामुळे शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले.

----------------------------------------------------

आ) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली?

उत्तर - शिवरायांनी प्रथम आजारी पडण्याचे सोंग केले, आपला आजार कमी व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यास प्रारंभ केला. रोज रोज पेटारे तपासून पहारेकरी कंटाळले. पुढे दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी शिवरायांनी हिरोजीस आपल्या जागी झोपवून मदारीस त्याचे पाय चेपीत बसवले. त्यानंतर शिवराय व संभाजी दोन पेटार्‍यात बसले. पहारेकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पेटारे उघडून न पाहताच ते जाऊ दिले. महाराजांचे औषध आणण्याच्या निमित्ताने हिरोजी व मदारी तेथून निसटले. अशाप्रकारे शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.

---------------------------------------------------

No comments:

Post a Comment