१७. गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन
स्वाध्याय
१. सांगा पाहू !
अ) दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ
- आज्ञापत्र
--------------------
आ) जलदुर्गांना असेही म्हणत
- जंजिरा
--------------------------------------------------------
२.तुम्हाला काय वाटते ते सांगा.
अ) शिवछत्रपतींचा ' भारतीय आरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो.
उत्तर - त्याकाळी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याकडे प्रबळ आरमारी दल होते. ते किनाऱ्यावरील लोकांचा छळ करत असत शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय 'आरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो.
---------------------------------------------------
आ) शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते ?
उत्तर - शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते. तसेच त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते अनुभवयास मिळते. जसे, गडकोटांची उभारणी, गडांचे व्यवस्थापन, तोफा, दारूगोळा, आरमार, गनिमी कावा, हेरखाते या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पहावयास मिळते.
--------------------------------------------
३. किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा.
अ) किल्लेदार
१. किल्ल्यांचे संरक्षण व कारभार पाहणे.
२. सबनीस, कारखानीस यांना आज्ञा करणे.
--------------------------
आ) सबनीस
१. गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे.
२. पत्रव्यवहार सांभाळणे.
--------------------------
इ) कारखानीस
१. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे.
२. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारूगोळ्याची व्यवस्था करणे.
---------------------------------------------------
४.महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणी दाखवा.
अ) सिंधुदुर्ग किल्ला आ) विजयदुर्ग
इ) मुंबई ई) प्रतापगड
----------------------------------------------------
५.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली ? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यात गनिमी कावा आम्हाला सर्वाधिक आवडली. गनिमी कावा या युद्ध तंत्रात आपल्याला सोयीच्या ठिकाणी अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रु त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. दैनंदिन जीवनात जर कोणी आक्रमण केले तर या तंत्राचा उपयोग करून आम्ही स्वतःला सुरक्षित स्थळी पोहोचवू.
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment