DAILY EDUCATION

Wednesday, February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १८.लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन



१८.लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन 

स्वाध्याय 

१.सांगा पाहू

अ) स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.

उत्तर - शिवरायांनी आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज आणि जंजीरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.

------------------------------------------------

आ) स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही.

उत्तर - दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत. प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्याशिवाय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यावर दुरुस्तीची कामे सुरू करत. या कामामुळे शेतकऱ्यांबरोबर कारागिरांना म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधी जाणवली नाही. 

------------------------------------------------------

इ) शिवरायांनी मलम्मा देसाई हिला दिलेला किताब 

    - सावित्री 

-----------------------------------------------------

२.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा.







--------------------------------------------------

३. चर्चा करा.

पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशाप्रकारे घेतलेली दिसून येते, तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल?

उत्तर - आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत, याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदा. आरमारासाठी लहान - मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोड इत्यादी तयार करावे लागत, त्यासाठी लाकूड लागते म्हणून फक्त सागवानाची झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे; परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी तोडू नयेत, असा शिवरायांचा आदेश होता. आम्ही पर्यावरण रक्षणासाठी जास्तीत जास्त झाडे लावू व जंगल तोडीला विरोध करू व जंगलाचे संगोपन करू. 

-----------------------------------------------------

४.वाचा व तुमच्या शब्दात माहिती सांगा.

'जलव्यवस्थापन ' या विषयाची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा. 

उत्तर - पाणीटंचाई असलेल्या भागात रस्ता हा मातीचाच असू द्यावा. त्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी मुर. पाण्याची साठवण करण्यासाठी तळी आणि टाक्या बांधाव्या. पाणी जमिनीत मुरेल अशी जागा ठेवावी. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात जमा होईल.

----------------------------------------------------

No comments:

Post a Comment