५.शिवरायांचे शिक्षण
*स्वाध्याय
१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ) शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते.
( संस्कृतचे, कन्नडचे, तमीळचे )
---------------------------
आ) मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात.
( शेतकरी, सैनिक, मावळे )
-----------------------------------------------
२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ)शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली?
उत्तर - शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूरच्या दरबारात केली.
----------------------------------------------
आ )शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ?
उत्तर - शिवरायांना शिक्षकांनी लिहिण्यावाचण्याच्या कलेबरोबर युद्ध कलेतील घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.
--------------------------------------------
इ )दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सुट का दिली?
उत्तर - शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली.
----------------------------------------------
३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ) पुण्याचे रूप कसे पालटले?
उत्तर - जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना दिलासा दिल्यामुळे लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली, त्यामुळे देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
---------------------------------------------------
आ) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या?
उत्तर - शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या अवगत झाल्या.
----------------------------------------------------
इ ) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता?
उत्तर - जिजाबाईंनी शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील, असा निश्चय केला होता.
-----------------------------------------------------
No comments:
Post a Comment