DAILY EDUCATION

Sunday, February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ७. स्वराज्याचे तोरण बांधले

 


७. स्वराज्याचे तोरण बांधले

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शिवरायांकडे पुणे सुप चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती.

( इंदापूर, सासवड, वेल्हे ) 

                  --------------------------

आ) शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले. 

( सिंहगड, शिवनेरी, तोरणा ) 

                  ---------------------------

इ) स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली.

( राजगड, रायगड, प्रतापगड ) 

-------------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या? 

उत्तर - महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाहा, विजापूरचा आदिलशाहा सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता हुकमत गाजवत होत्या. 

-----------------------------------------------------

आ) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?

 उत्तर - शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

-----------------------------------------------------

इ) शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले?

उत्तर - शिवरायांनी आदिलशहाला 'जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.' असे उत्तर पाठवले.

-----------------------------------------------------

३. कारणे लिहा 

अ) स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

 कारण -  महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. या किल्ल्याकडे आदिलशाहाचे फारसे लक्ष नव्हते. तसेच किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारूगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले, म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

----------------------------------------------------

आ) तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.

 कारण - तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले.काम चालू असतानाच मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी किल्ल्यावर सापडल्या.' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले.' असे कामकार्‍यांनी म्हटले. हे धन स्वराज्याचे आहे आणि ते आपल्या धन्याच्या स्वाधीन केले पाहिजे असा विचार करून एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही. मोठ्या आनंदाने तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायाजवळ आणून दिल्या.

-----------------------------------------------------

No comments:

Post a Comment