२१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन
सांगा पाहू
१) कौटुंबिक सहलीत गोंधळ कशामुळे झाला असे तुम्हाला वाटते?
उत्तर - व्यवस्थापनाच्या अभावामुळे कौटुंबिक सहलीत गोंधळ झाला.
-------------------------------------------
२) असा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?
उत्तर - कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते. आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे हा उपाय गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक आहे.
-------------------------------------------
• सांगा पाहू
१) तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात?
उत्तर - वर्गाची स्वच्छता करणे, वर्गातील खडू, डस्टर यासारख्या वस्तू व्यवस्थित ठेवणे, फळा स्वच्छ करणे हे नियमित तपासण्याची जबाबदारी पार पाडणे, फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे ही कामे वर्गाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वाटतात.
-------------------------------------------
२) ती कामे पार पडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल?
उत्तर - वर्गातील काही कामे जबाबदारीने पार पाडण्यासाठी वर्ग प्रतिनिधीची आवश्यकता असते. जो विद्यार्थी कामाचा आराखडा तयार करून जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने वर्गातील कारभार कार्यभार सांभाळू शकेल त्याच विद्यार्थ्याला आम्ही वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून देऊ.
-------------------------------------------
• सांगा पाहू.
१) रस्त्यावर अपघात का होतात?
उत्तर - रस्त्याने वाहने चालत असताना जर एखाद्या वाहन चुकीच्या दिशेने येत असेल तर वाहन चालवणाऱ्याचा गोंधळ उडतो, भरधाव वाहन चालवत असल्यास अपघात होण्याची शक्यता असते. तसेच पायी चालणाऱ्या लोकांसाठी झेब्राक्रॉसिंगची सोय प्रत्येक चौकात केलेली असते. त्याचा उपयोग केला नाही आणि रस्त्यावरील नियमांचे पालन केले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते.
-------------------------------------------
२) वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे?
उत्तर - समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे. अपघात होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
-------------------------------------------
स्वाध्याय
अ) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे?
उत्तर - आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे. ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे.
-------------------------------------------
२) नियम का तयार केले जातात?
उत्तर - समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूहजीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात.
-------------------------------------------
आ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
१) कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते.
२) काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.
३) स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात.
-------------------------------------------
इ) घरी पाहुण्यांना जेवायला बोलवायला आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल?
उदा.जेवायला कोणते पदार्थ बनवायचे?
उत्तर - १) जे पदार्थ बनवायचे आहे त्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे हे पाहावे.
२) हे सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment