•आळस हा माणसाचा शत्रू आहे.
• आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे.
• शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
• शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
• परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत.
• सर्वांकडे समान कौशल्य नाही पण कौशल्य विकसित करण्याची समान संधी मात्र आहे.
• समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान कामाचे नाही.
• ज्यांना हरण्याची भीती आहे, त्यांचा पराभव निश्चित आहे.
• तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका, पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
• एखादी चांगली गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचे मिळणारे फळ हे महाकाय असते.
•हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्या हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा.
• कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडतो.
• शहाणपण कोणालाही शिकवता येत नाही ते उपजतच असावं लागतं.
• परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसाच्या सहवासात राहण्यापेक्षा, परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात रहा.
• तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य.
• प्रत्येक दिवस ही तुम्हाला मिळालेली दुसरी संधी असते.
• कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र मोठे लागते.
• गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही.
• प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही.
• संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
• सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
• काळोखास दोष देण्यापेक्षा एक लहान मेणबत्ती पेटवणे अधिक श्रेयस्कर असते.
• दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला, जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.
No comments:
Post a Comment